Thursday, May 17, 2018

संविधान आणि भीती कशाची आहे ?श्रीधर तिळवे नाईक

१ काँग्रेसबद्दल भीती फक्त आणीबाणीच्या काळात निर्माण झाली आणि इंदिरा गांधी हत्येनंतर शीखविरोधी दंगलीत गांधीहत्येनंतर अशीच भीती ब्राम्हणांच्यात निर्माण झाली होती असे जुने वृद्ध लोक सांगायचे म्हणजे भीती निर्माण करण्याबाबत काँग्रेस फार सोवळी आहे असे कुणीही मानू नये शिवाय गावोगावचे काँग्रेसचे सहकारसम्राट आणि अलीकडचे काही शिक्षणसम्राट व राजघराणीसम्राट भीती निर्माण करण्यात कुठे कमी पडतायत असे नाही बिहारमध्ये लालू आणि उत्तर प्रदेशात मुलायम हेही भीती निर्माण करण्यात कुठे कमी पडलेत असे दिसत नाही कम्युनिस्टांनी रशिया व चीन मध्ये भीती निर्माण करण्यात परमोच्च शिखर गाठले होते तेव्हा शासक समूह हा कुठेही आणि कसाही असला तरी भीती निर्माण करण्यात वाकबगार असतो ही वस्तुस्थिती ! किंबहुना राजकारण हा भय आणि भीती निर्माण करण्याचा कारखाना आहे सत्तेची अपरिमित असोशी व लालसा ही प्रत्येक माणसाच्या ठायी आहे आणि ती प्रत्येकालाच वेडं बनवते कुणी कलाक्षेत्रात आपली सत्ता निर्माण करतो तर कुणी प्रशासनात ही सत्ता आपल्या आयुष्यासंदर्भात आपल्या मर्डरपासून आपल्या मुलाच्या शिक्षणापर्यंत एकतर्फी निर्णय घेऊ शकते असे वाटणे म्हणजे भय आणि ह्या भयाचे प्रात्यक्षिक सत्ताकारी तांडव म्हणजे भीती .
२भाजप आत्ताचे संविधान रद्द करून मनू आदी स्मृतिकारांच्या स्मृतीनुसार धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणी संविधान आणून इस्लामि देशांनी जसे शरियत लागू केले तसे हे ब्राह्मविधान निर्माण करून ते लागू करेल ही भाजपविषयीची भीती !ह्या भीतीला काही आधार नाही हे पटवणे हे भाजपच्या प्रवक्त्यांचे व विचारवंताचे काम आहे ते हे काम करत नाहीत उलट मनूचा पुतळा राजस्थान विधानसभेच्या आवारात निर्माण करून ते ही भीती वाढवतायत

३ प्रश्न असा आहे कि त्या त्या देशातील मुस्लिमांना जसे शरियत हवे होते तसे ह्या देशातील हिंदूंना मनूचे व इतरांचे धर्मशास्त्र हवे आहे का ?शैवांना अर्थ , काम आणि मोक्ष असे तीनच अक्ष हवे होते असे मी कायमच ओरडून सांगत असतो पण त्याचा एक मूलभूत अर्थ असा होतो कि शैवांना कायदेव्यवस्था धर्मानुसार न्हवे तर अर्थ आणि काम ह्या दोन अक्षांनुसार हवी असते शैवांच्या मते हे दोन्ही अक्ष अस्थिर व सतत काळानुसार बदलत असल्याने कायदेही सतत बदलणे अपरिहार्य आहे ह्यातील अर्थ हा सामाजिक आणि काम हा कौटुंबिक तर मोक्ष हा पूर्णपणे वैयक्तिक आहे ह्यामुळे बदलत्या कायद्यांना सतत मान्यता देणे हे शैवांच्या अंगवळणी पडलं आहे किंबहुना कायद्याबाबत शैवांची अटीट्युड who bothers अशीच आहे ह्याचा एक दुष्परिणाम असा झालाय कि कुणीही कोणताही कायदा आणला तरी शैव तो सहज स्वीकारतात त्याची साधी चिकित्साही न करता ! ह्या देशातील वैश्य शूद्र अतिशूद्र आणि आदिवासी ह्यांची मानसिकता ही शैव मानसिकता आहे आणि तिची कायद्याबाबतची निष्काळजी वृत्ती ही तिला अनेकदा गुलाम बनवण्यात महत्वाचा रोल बनवते त्यामुळेच उद्या भाजपने मनूचे नवे धर्मशास्त्र नवे संविधान म्हणून आणले तर शैव खरोखर त्याची चिकित्सा करतील का कि पुन्हा who bothers म्हणून खांदे उडवतील ? शैवांना सत्ताधारी म्हणून राजधानीत एक गणाधिपती हवा असतो तो स्वदेशी कि विदेशी हा प्रश्नही त्यांना पडत नाही किंबहुना त्यांच्या मानसिकतेत राजकारण ही फक्त करमणूक आहे आणि निवडणूक हा आणखी एक गणपती उत्सवासारखा उत्सव ! आपल्या आयुष्यावर तिचा काही सखोल परिणाम आहे असे त्यांना वाटतच नाही धसका घ्यावा अशी ही निष्काळजी वृत्ती आहे शैव विचारवंतांना खरी भीती ह्या निष्काळजी वृत्तीची वाटायला हवी

४ आता समजा उद्या भाजपने सगळ्यांचे आडाखे चुकवत आत्ताचे संविधान बदलून एक नवे समान नागरी कायदा पाळणारे काश्मीर वैग्रे राज्याचे स्वायत्त विशेष दर्जा रद्द करणारे सर्व प्रकारची समानता व समता जोपासणारे अतिशय आधुनिक असे संविधान आणले  तर काय करायचे ? माझे स्वतःचे स्पष्ट मत असे कि असे काही आत्तापेक्षा अधिक उत्तम व अव्वल दर्जाचे संविधान भाजप आणत असेल तर मी त्याचे स्वागत करायला एका पायावर तयार आहे किंबहुना काँग्रेसने असे संविधान आणण्याची जबाबदारी पार पाडली असती तर भाजपचा उदय झालाच नसता असे माझे मत आहे पण भीती अशी आहे कि असे काही न होता भाजप सर्व प्रकारची विषमता जोपासणारेच नवे संविधान आणेल आणि खरी गोची इथेच आहे भारत जाऊ द्या पण ज्या उत्तर प्रदेशात भाजपचे प्रचंड बहुमत आहे तिथेही भाजपने गोव्याप्रमाणे समान नागरी कायदा आणलेला नाही भाजप फक्त हिंदूंच्या भावनांशी खेळतंय ही शंकाच हिंदूंची खरी भीती आहे

जुनी पोस्ट ७/५ /१८

श्रीधर तिळवे नाईक

नितिन भरत वाघ तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढे मिळतील मी अद्यापही पुरोहित समुदायाबद्दलच लिहितोय