भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग ३ श्रीधर तिळवे नाईक
भारतातील भक्ती संप्रदाय हा फार प्राचीन भावतंत्राचा भाग आहे आणि तो प्रामुख्याने शैव तंत्राचा भाग आहे जैन आणि बौद्ध हे दोन्ही धम्म ज्ञानतंत्रातले आहेत साहजिकच तिथे मूर्ती पूजेची शक्यताच निर्माण झालेली नव्हती असे असताना सुद्धा भारतीय इतिहासामध्ये अनेकदा काही अति शहाणे इतिहासकार बुद्ध आणि महावीर यांच्यापासून शिवाची आणि विष्णूची मूर्ती निर्माण झाली असे भासवत असतात वास्तविक शैव-धर्मामध्ये भक्ती किंवा भावतंत्राचे जे तंत्र आहे त्यात शिवलिंगाची पूजा केली जात होती. पर्शियन आणि ग्रीक लोकांच्या आक्रमणानंतर मात्र आपल्याकडे ही मंदिरातील मूर्ती पूजा सुरू झाली त्यापूर्वी शैवधर्मी लोकांच्यात फक्त देव्हाऱ्यातच मूर्ती ठेवली जात होती
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवाची मूर्ती पूजा ही वेगळी गोष्ट आहे आणि शिवाची लिंग पूजा ही वेगळी गोष्ट आहे पण या गोष्टीतला फरक जाणीवपूर्वक समजून न घेता भावतंत्र किंवा भक्ती संप्रदाय हा जैन आणि बौद्ध धर्मातून निर्माण झालेला आहे अशा प्रकारची मांडणी काही लोक करत असतात त्यामुळे ही भारतीय कालगणना अधिक गुंतागुंतीची बनते वास्तविक यासंदर्भातले सत्य इतकेच आहे की युरेशियन लोकांनी शैवधर्म संस्कृतीकडून लोकांच्याकडून भक्ती स्वीकारली भाव स्वीकारला भाव तंत्र स्वीकारले आणि मूर्ती पूजा ही स्वीकारली मूळ बौद्ध धम्मामध्ये मूर्ती पूजा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे खुद्द जिवंत असताना सुद्धा गौतम बुद्धांनी कधीही आपली पूजा अलाव केली नाही किंबहुना स्वतःलाच प्रमाण मानाने हा त्यांचा उद्देश आहे उपदेशही आहे मग बौद्ध धर्मामध्ये मूर्तिपूजा कशी आली ?
बौद्ध धम्मातील आद्य असलेल्या गौतम बुद्धाच्या मूळ उपदेशातून निर्माण झालेल्या ज्ञानतंत्राचा जसा जसा पराभव होत गेला त्याचा प्रभाव कमी होत गेला तसा तसा भावसंप्रदाय स्वीकारून गौतम बुद्धाची आणि महावीराची पूजा प्रस्थापित केली गेली जेणेकरून जैन आणि बौद्ध धम्मातले लोक धम्म सोडून जाऊ नयेत आजही आपण हे पाहू शकतो की इस्लामची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे याचे कारण बहुतांशी लोक अजूनही भावतंत्रामध्येच अडकलेले असतात मुख्य म्हणजे तिथे मोक्षाच्या ऐवजी अनेकदा नवस बोलणे मन्नत मागणे अशा प्रकारच्या श्रद्धांजन्य गोष्टी करता येतात ज्या इतर तंत्रांच्या मध्ये अशक्य आहे ज्ञानतंत्रामध्ये नवस बोलणे बसत नसल्याने पुढे पुढे बुद्धाला नवस बोलणे शक्य व्हावे म्हणून बुद्धाच्या मूर्ती निर्माण करण्यात आल्या धर्म टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे हे तत्कालीन बौद्ध धर्म गुरूंना वाटले आजही हे योग्य होते की नाही हे ठरवणे अवघड आहे त्यातूनच मग बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना निर्माण झालेल्या दिसतात
सगुण ईश्वर हा प्रत्येक माणसाला हवासा का वाटतो हा एक फार मोठा प्रश्न आहे प्रत्येक माणसाला मोठा बिग ब्रदर किंवा बिग फादर आवश्यक वाटतो आणि त्यातूनच भावतंत्र हे प्रभावी बनत जाते मूळ भाव तंत्रामध्ये फक्त शिवलिंगाचीच पूजा अपेक्षित होती आणि आजही ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना फक्त शिवलिंग किंवा शक्ती लिंग यांचीच पूजा करण्याची अनुमती आहे पुढे या दोन्ही लिंगांचा समन्वय करून ईश्वरलिंग निर्माण करण्यात आले आणि आज भारतातल्या बहुतांशी शैव मंदिरामध्ये ईश्वर लिंगच आहे म्हणूनच या लिंगांची नावे ओंकारेश्वर त्रंबकेश्वर अशी असतात बाकीच्या सर्व पूजा यानंतर पंडित , गुरव आणि नंतर ब्राह्मणांनी आणलेल्या आहेत आणि त्या सर्व शैव पुरोहितांनी म्हणजेच गुरव किंवा सर्व पंडित शैवाचार्य यांनी स्वीकारलेल्या आहेत भारतात गणपतीची पूजा तर अत्यंत पद्धतशीरपणे आणली गेली आणि बाप से बेटा सवाई अशा तऱ्हेने फेर रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून शंकर ही देवता बाजूला व्हावी आणि गणपती हा देव अधिकाधिक बळकट व्हावा आता तर अवस्था अशी आहे की गणपती ही देवता ब्राह्मणांचीच देवता होऊन गेली आहे आणि यामध्ये पेशवाईचा वाटा प्रचंड होता कारण त्यांचे ते कुलदैवत होते आत्ताचा गणपती हा शैव कमी आणि हिंदु जास्त आहे त्याच्या निर्मिती कथेपासून सर्व काही बदलण्यात आलेले आहे आणि बरेचसे काल्पनिक आहे ही वस्तुस्थिती आहे पण ही काल्पनिकता हीच ब्राह्मण धर्माची सर्वात मोठी ताकद असते दंतकथा निर्माण करून इतिहास नष्ट करणे हा ब्राह्मणांचा सनातन धंदा आहे
भारतातील सर्वात प्राचीन कालगणना ही शैव कालगणना आहे आणि तिचे स्वरूप नेमके आजही स्पष्ट होत नाही भारताला मिळालेले पहिले नाव हे इंदू आहे आणि चिनी लोक याच अंगाने भारताचे नाव घेताना दिसतात दुसरे नाव अर्थातच मेरू पर्वत म्हणजेच सह्याद्री या अंगाने येते आणि त्यातूनच मेरूहाचे मेलूहा झालेले दिसते मेरू पर्वतापाशी राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून म्हणजे सह्याद्रीच्या आसपास राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून हे नाव आहे जे प्रामुख्याने दक्षिण भारतासाठी वापरले जात होते समुद्रमंथन करताना हिमालय पर्वताची कधीही रवी झालेली नाही कारण हिमालय समुद्रापासून प्रचंड दूर आहे पण मेरू पर्वत मात्र अनेकदा समुद्र ढवळताना दिसतो याचे कारण तो दक्षिण भारतात आहे आणि दक्षिण भारतीय लोक खरोखरच या काळामध्ये समुद्र ढवळून काढत होते आणि आफ्रिकेला पोहोचत होते आणि कदाचित अमेरिका या खंडा पाशी ही पोहोचत होते इंदू या शब्दाचा अर्थच चंद्र असा होतो आणि चंद्राप्रमाणे कालगणना करणारे ते इंदू अशी ही मूळ व्याख्या आहे या इंदूचाच अपभ्रंश होऊन पुढे हिंदू हा शब्द उदयाला आलेला आहे भारताचा इतिहास लिहिताना कायम उत्तर भारताच्या अंगाने लिखाण करणे ही उत्तर भारतीय लोकांची खोडी आहे ती आपण स्वीकारण्याची काही कारण नाही विशेषतः मराठी लोकांनी तरी भारतीय इतिहास कायम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्या संदर्भात पाहिला पाहिजे उत्तर भारतीय धर्म ज्यामध्ये वैष्णव जैन बौद्ध असे धर्म येतात ते जास्तीत जास्त दक्षिण भारतात मोठे करून दाखवणे ही उत्तर भारतीय लोकांची आणि इतिहासकारांची गरज आहे कारण त्यामुळे ते हल्ली दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात करत असलेल्या स्थलांतराला आधार मिळतो त्यामुळेच ते इतिहासाच्या नावाखाली त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी अनेक दंतकथा लिहित असतात त्या आपण स्वीकारण्याची गरज नाही
आठव्या शतकानंतर उत्तर भारतीय इतिहासाचा प्रभाव फारसा पडलेला दिसत नाही आणि म्हणूनच मग दक्षिणेतून शंकराचार्य उदयाला येताना दिसतात याचे कारण कळत नकळत उत्तर भारतामध्ये एक प्रकारचा अनागोंदी कारभार झालेला दिसतो त्या उलट 800 ते 1200 या कालखंडात ब्राह्मण धर्माला मदत करणारे जे काही घडले ते दक्षिण भारतात घडले असे दाखवले जाते आणि या काळामध्ये उत्तर भारतात नवनाथांचा विशेषता गोरखनाथांचा जो प्रभाव वाढत गेला शैव प्रभाव वाढत गेला त्याविषयी अवाक्षर सुद्धा काढले जात नाही हिंदी भाषेची सुरुवात गोरखनाथांनी केली हे सुद्धा डावलले जाते
या काळात दक्षिण भारतात विशेषता केरळमध्ये वैष्णव धर्म वाढीला लागला आणि वैष्णव धर्म वाढीला लागला म्हणूनच वर्णव्यवस्था वाढीला लागली आणि वर्णव्यवस्था वाढीला लागली म्हणून तिथे हळूहळू वर्ण व्यवस्थेला शह देणारा धर्म म्हणून आचार्य शंकर यांच्या अवस्था दर्शनाचा आणि ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि आज केरळमध्ये 30 टक्के लोक ख्रिश्चन झालेले आहेत याला कारण इथला वैष्णव प्रभाव आणि त्या धर्माने आणलेली अत्यंत कडक वर्णव्यवस्था होय ब्राह्मण धर्माने दक्षिण भारतात बळकावलेला हा पहिला भूप्रदेश आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित तामिळनाडूमध्ये फूट पाडून तामिळनाडू मधून केरळ नावाचा स्वतंत्र प्रांत निर्माण करून मल्याळम नावाची स्वतंत्र भाषा निर्माण करून प्रभाव निर्माण करत बळकावलेला आहे आज दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक महत्त्वाची वैष्णव मंदिरे ही केरळामध्ये आहेत हा योगायोग नाही तिथली मूळची सर्व मातृसत्ताक पद्धत कशी पद्धतशीरपणे ब्राह्मण धर्माने ताब्यात घेतली हा एक करूण इतिहास आहे वर्ण व्यवस्थेचे सर्वाधिक घृणास्पद रूप आपणाला उत्तर भारतात दिसण्याएवजी केरळमध्ये दिसते याहून दक्षिण भारताला लाज वाटणारी कुठली गोष्ट असू शकते ? साहजिकच या वर्णव्यवस्थेच्या विरोधात इथे कम्युनिस्ट पक्ष सुद्धा आपोआप वाढीला लागला कारण इथल्या बहुजन लोकांना कम्युनिजम स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता आज अवस्था अशी आहे की केरळ मधून असा एक सिद्धांत उदयाला येतो आहे की भक्ती संप्रदाय भारतामध्ये ख्रिश्चन लोकांनी सुरू केला हे असे का घडते याच्या मुळात सुद्धा जाण्याची गरज हिंदुत्ववादी लोकांना वाटत नाही कारण त्यांना इथे पुन्हा एकदा कशी वर्णव्यवस्था आणता येईल हेच पाहायचे आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रभावाचा सखोल मागोवा घेण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्ड घेऊन प्रश्नाला बगल देणे चाललेले आहे जर का खरोखर हिंदुत्ववादी लोकांना केरळमध्ये काही करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांनी केरळमध्ये वर्णव्यवस्थेवर प्रचंड अटॅक केला पाहिजे पण असे काही न करता सनातन धर्माचा घोष करत हिंदुत्ववादी धार्मिक कार्ड खेळत असतात त्यामागे पुन्हा एकदा ब्राह्मणी सत्ता आणायची अशी इच्छा आहे की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे या सगळ्याची जर का बीजे आपण शोधायला गेलो तर ती आठव्या शतकापासून 12 व्या शतकापर्यंत पसरलेल्या केरळच्या इतिहासात आहेत आणि याच कालखंडामध्ये आद्य शंकराचार्य नावाची व्यक्ती होऊन गेली किंवा निर्माण केली गेली हा योगायोग नाही आचार्य शंकर होऊन गेले याबद्दल माझ्या मनात शंका नाही परंतु त्यांनी सांगितलेला पंचायतन उपदेश हा शैव होता हा उपदेश आणि आद्य शंकराचार्यांच्या सहाय्याने सांगण्यात येणारा ब्राह्मणधर्मी उपदेश याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे किंबहुना केरळ मधील सर्व शैव व्यवस्था ताब्यात घेण्याचे जे काही प्रयत्न झाले त्यातला हा आद्य प्रयत्न होय तो यशस्वी झाला आणि केरळची वाट लागत गेली तिथली वर्णव्यवस्था अधिकाधिक बळकट होत गेली
या कालखंडाबाबत नेहमीच इतिहासकार एक प्रश्न विचारत असतात तो म्हणजे या कालखंडामध्ये नेमके पुरातत्वीय पुराव्याचे काय होते ? आपण या कालखंडाकडे जर पाहिले तर हा कालखंड भावतंत्राच्या प्रचंड प्रभावाचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे इथले पुरातत्वीय पुरावे हे प्रामुख्याने मंदिरांच्यावर कोरले गेलेले शिलालेख किंवा इतर लेख आहेत त्यामुळे जमिनीत पुरावे शोधण्याऐवजी जमिनीवर उभा करण्यात आलेल्या मंदिरामध्ये पुरावे शोधणे योग्य होय या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी मंदिर शास्त्र हे अधिक उपयुक्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये लिहिले गेलेले धार्मिक वाङ्मय व धार्मिक शिलालेख दान शिलालेख राजकीय शिलालेख आपण नीट तपासले पाहिजेत कारण त्यामध्येच या कालखंडाचा खरा इतिहास लपलेला आहे 12 व्या शतकानंतर मात्र मुस्लिम इतिहासकारांनी अनेक गोष्टी तपशीलवार लिहिणे सुरू केले आणि त्याचा प्रभाव पडून भारतात सुद्धा अशा प्रकारचे वृत्तांत लेखन सर्व राजदरबारी सुरू झाले असे दिसते या लेखनामध्ये दंतकथांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना भारतातल्या अनेक दंतकथा ह्या मुळात या कालखंडात निर्माण झालेल्या आहेत राज दरबारी असलेले इतिहासकार आपल्या राजाची अनेकदा देवासारखी स्तुती करत असतात त्याचा प्रचंड प्रभाव इस्लामिक इतिहासकारांच्या वर आहे आणि भारतीय दरबारी इतिहासकारांच्यावरही होता आणि आहे आणि त्यांनीच या कालखंडाचा इतिहास राज्यव्यवस्थेत आणि राजाच्या स्तुतीत बुडवत बुडवत धुसर केलेला दिसतो या कालखंडामध्ये पुरातत्व शास्त्र आपणाला जास्त मदत करत नाही त्याऐवजी लेखनशास्त्र ज्याला आज काल ग्रॅमॅटोलॉजी असे म्हटले जाते आणि मंदिर शास्त्र असे म्हटले जाते तेच जास्त उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे आपल्याकडचे काही इतिहासकार आजकाल 800 ते 1200 या कालखंडामध्ये पुरातत्वीय पुरावे नाहीत म्हणून खूपच शोक करत असतात म्हणून हे सांगावे लागते
महाकाव्ये आणि पुराणे बलवान होण्याचा हा कालखंड आहे याचे कारण मंदिरांची सातत्याने होत गेलेली निर्मिती ! शैव मंदिर हे फक्त कधीच भक्तांसाठी नव्हते तर त्यामध्ये अनेक सिद्ध आणि साधना करणारे साधक व दरम्यानचे साधू हे सुद्धा मुक्काम ठोकत असत हे आपण लक्षात घेतले पाहिजे अगदी जैन मंदिरे सुद्धा शैव मंदिरांनाच फॉलो करत होती जैनांच्यात सुद्धा सिद्ध साधू आणि साधक ही व्यवस्था आपणाला दिसते आणि त्यांच्या मूलमंत्रामध्ये हे स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे या सर्व मंदिरांच्या मध्ये तपस्या करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचंड जागा होती विशेषता जी मंदिरे डोंगरामध्ये वसत तिथे तर अनेक साधू तपस्या करताना आजही दिसतात शैव मंदिरांच्या मध्ये शरीर ,ज्ञान,भाव , क्रिया आणि शक्ती अशी पंचतंत्रे कार्यान्वित असत आणि ती तशीच असली पाहिजे अनेक मंदिरांना याचा हल्ली विसर पडलेला आहे निदान पक्षी शैव मंदिरांच्या मध्ये तरी ही सर्वच्या सर्व पंचतंत्रे आपण इंट्रोड्यूस केली पाहिजेत अन्यथा पुन्हा एकदा फक्त भक्तीचा सुळसुळाट सुरू राहील आणि ते भारताच्या विकासाला परवडणारे नाही भारतातली सर्वात प्राचीन मंदिरे ही सुद्धा शैव मंदिरे आहेत आणि पुढे त्यांना शह देण्यासाठी म्हणूनच वैष्णव मंदिरे उभी करण्यात आली किंवा मग शैव मंदिरे राजवटींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन त्याच्यात वैष्णव देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अगदी अलीकडे सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पद्धतशीरपणे महालक्ष्मीची स्थापना करण्यात आलेली आहे किंबहुना अंबाबाईच्या जागी कशी महालक्ष्मी येते हे पाहिले की वैष्णव धर्मीय लोक 800 ते 1200 या कालखंडात आपले राजकारण कसे खेळत असतात ते स्पष्टपणे कळू शकते या कालखंडातले बहुतांश शिलालेख आणि अनेक सोकार्ड पौराणिक लेखन हे काल्पनिक असल्याचा संशय सर्वच इतिहासकारांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे अनेक काल्पनिक पुराणे अत्यंत जाणीवपूर्वक देवळांशी जोडली जाऊन किंवा स्थलस्थळ पुराणे निर्माण करून त्या देवळांचा इतिहास पूर्णपणे बळकावण्याचा प्रकार आपल्याकडे घडलेला दिसतो अलीकडे तर बाळूमामासारखा शैव बहुदा लिंगायत संत वैष्णव करण्यात आलेला दिसतो हे सर्व ब्राह्मण धर्मीय लोक कसे पद्धतशीरपणे खेळी खेळत असतात त्याचे नमुने आहेत तरीसुद्धा बहुजन समाजाला काही xxx येते असे दिसत नाही 800 ते 1200 या कालखंडामध्ये हेच घडलेले आहे यामध्ये आपले विठ्ठल मंदिर सुद्धा येते जे मूळचे शैव होते पण नंतर वैष्णव करण्यात आले आणि तिथले मूळचे महादेव कोळी पुजारी हटवून त्या जागी वेगळे पुजारी आणले गेले जे विठ्ठलाला वैष्णव अवतार मानतात. जेव्हा दहाव्या शतकानंतर विष्णू सारख्या वैदिक देवतेला बहुजन समाजाकडून मान्यता मिळतच नाही हे लक्षात आले तेव्हा मग अत्यंत पद्धतशीरपणे राम आणि कृष्ण यांचे महत्त्व ब्राह्मण लोकांनी वाढवणे सुरू केले ते आजही वाढवणे सुरू आहे या कालखंडामध्ये सुद्धा जी कालगणना पद्धत अस्तित्वात आली ती अशीच स्थानिक राज्यकर्त्यांच्या कडून निर्माण झालेली दिसते
भारतातल्या सर्वात प्राचीन कालगणना या ऋषीमुनींची निगडित करणे ही ब्राह्मणांची गरज होती साहजिकच सप्तर्षीची कल्पना अत्यंत पद्धतशीरपणे वाढवण्यात येऊन सप्तर्षी कालगणना आणण्यात आली त्यासाठी अनेकदा शैव-धर्मामध्ये सुद्धा ढवळाढवळ केलेली दिसते म्हणजे शंकराला सर्वात प्रथम मोक्ष मिळाला हे मान्य करायचे मात्र त्याचे सर्वात पहिले सात शिष्य कोण तर हे सात ऋषी होते अशी मांडणी करायची प्रत्यक्षामध्ये हे सात ऋषी नव्हते तर ते सात शिष्य होते आणि त्यांची नावे वेगळी आहेत अपवाद फक्त अगस्ती असेल या सात शिष्यांना बळकावून त्यांना सप्तर्षी अशी संज्ञा देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नावाने मग कालगणना सुरू झालेली दिसते इथे मूळ आद्यशैव कालगणना बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे
पुढे मग जेव्हा समाजात अनागोंदी कारभार वाढत गेला तेव्हा त्याचे समर्थन करण्यासाठी महाभारताच्या कालखंडामध्ये म्हणजेच सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 1000 या कालखंडामध्ये चार युगांची संकल्पना विकसित करण्यात आली आणि त्यातूनच आज-काल कलियुग कालखंड सुरू झालेला दिसतो
पुढे मात्र क्षत्रियांनी कालगणना ताब्यात घेतलेली दिसते त्यातूनच मग वेगवेगळ्या राजांच्या कालगणना , वेगवेगळ्या राज्यांच्या कालगणना सुरू झालेल्या आहेत भारत हा एकसंध राष्ट्र नव्हता त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या राज्यांच्या राजांनी आपल्या नावे कालगणना सुरू केल्या याचे आश्चर्य नाही म्हणजेच सर्वसाधारणपणे भारतामध्ये आपणाला असे दिसते की एक आद्यशैव कालगणना आहे त्यानंतर ब्राह्मणधर्मी ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या दोन ब्राह्मणी कालगणना आहेत आणि मग क्षत्रिय लोकांनी आपल्या नावे निर्माण केलेल्या क्षत्रिय कालगणना आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सातवाहन लोकांनी सुरू केलेली शक कालगणना शके दिसते तिच्याबद्दलचा वादविवाद अजूनही संपलेला नाही ह्या इतक्या सगळ्या चाळीसच्या आसपास असलेल्या कालगणना घेऊन आपण नेमके काय करू शकतो ? त्यामुळेच एक तर आपण इसवी सन पूर्व 20000 पासून कालगणना सुरू करावी हे उत्तम त्यामध्ये भारतातल्या सर्व प्राचीन पुरातत्वीय उत्खननांना न्याय देता येतो आणि शैव लोकांना स्वतःची कालगणना पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची संधी मिळते सर्वसाधारणपणे वीस हजार वर्षांपूर्वी भगवान शंकर (आदिवासी साहित्य प्रमाण मानल्यास आपणाला शंभू असे नाव द्यावे लागेल शिव हे तत्व आहे शंभू हा होऊन गेलेला पुरुष आहे) यांचा मृत्यू किंवा जन्म इथून ही कालगणना सुरु होते म्हणजे आपणाला इसवी सन 2000 असे न म्हणता इसवी सन 22000 असे म्हणावे लागेल आपल्या लोकांना हे कितपत झेपेल याविषयी मला शंका आहे पण आपले प्राचीनत्व सिद्ध करण्याची आणि ते व्यवहारात वागवण्याची कालगणना हीच एक संधी असते आपणाला अजूनही ही गोष्ट कळलेली नाही वैदिक लोकांच्या प्रचंड ब्राह्मक कालगणना आपल्या कामाच्या नाहीत कारण त्या बनावट वाटायला लागतात उत्खननशास्त्रामध्ये भारतामध्ये विशेषता दक्षिण भारतामध्ये जेव्हा उत्खनन होईल तेव्हा आपणाला इसवी सन पूर्व दहा हजार पर्यंत तरी किमान जावे लागेल असा माझा अंदाज आहे कदाचित त्या आधीचे ही उत्खनन शास्त्रीय पुरावे सापडू शकतात त्यांना जागा असावी म्हणून इसवी सन पूर्व 20000 ही काल गणना स्वीकारलेली आहे भगवान शंभू हे प्रामुख्याने पशुपालक कालखंडात जन्मलेले आहेत हे अत्यंत निर्विवाद आहे आणि पशुपालन हे साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी सुरू झालेले आहे म्हणूनच इतकी प्राचीन सुरुवात करावी लागते
या कालगणने विरोधात लढणे आपणाला शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर मग ब्राह्मण लोकांनी वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबलेली दिसते वेदांचा कालखंड आजकाल लाखो वर्षांपूर्वी नेण्याचा जो प्रयत्न होत आहे तो आत्ताचाच नाही तर पौराणिक महाकाव्यीक काळापासून चाललेला उद्योग आहे आणि यामागे उद्देश एकच आहे तो म्हणजे शैव कालगणनेला शह देणे बौद्ध आणि जैन कालगणनेला शह देणे प्रत्यक्षात हे साधलेले दिसत नाही याचे कारण वैदिक संशोधनामध्ये युरोपियन लोकांनी घेतलेला इंटरेस्ट ! युरोपियन संशोधक काही केल्या वेदांचा कालखंड हे इसवी सन पूर्व पंधराशे च्या पूर्वी घेऊन जात नाहीत त्यामुळेच अलीकडे युरोपियन लोकांच्या इतिहासाबद्दल शंका निर्माण करणे सुरू झालेले आहे
थोडक्यात काय जैन आणि बौद्ध धर्माला शह देता यावे म्हणून आणि शैव लोकांचा प्रभाव कमी करावा म्हणून 800 ते 1200 या कालखंडात रामायण आणि महाभारत यांचा दबदबा आणि गवगवा वाढवण्यात आला राम आणि कृष्ण यांची मंदिरे उभी करण्यात आली आज सर्वांनाच माहिती आहे की इसवी सन सातव्या शतकापूर्वी आपणाला एकही राम मंदिर किंवा एकही कृष्ण मंदिर दिसत नाही कारण रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतून उदयाला आलेल्या या देवता आहेत आणि भारतीयांनी जेव्हापासून या महाकाव्यिक देवतांचा स्वीकार केला तेव्हापासून त्यांचे पतन सुरू आहे ते अजूनही थांबलेले नाही जगात सर्वत्रच महाकाव्य लिहिली गेली तशी ती भारतातही लिहिली गेली परंतु जगातल्या सर्व लोकांनी आपल्या आपल्या महाकाव्यातून निर्माण झालेल्या देवता नंतर सोडून दिल्या भारतात मात्र अशा प्रकारचा त्याग करता आला नाही किंबहुना भारतातल्या ब्राह्मण पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा त्याग होणार नाही याची काळजी घेतली याचे कारण एकच ते म्हणजे पौराहीत्य व्यवसाय आणि वर्ण व्यवस्थेला या रामायण आणि महाभारतातून मिळणारा सपोर्ट !
रामायण आणि महाभारतामुळे आठव्या शतकापासून वैष्णव धर्म प्रभावी होत गेला मात्र त्याला शैव-धर्मावर शेवटपर्यंत मात करता आली नाही आणि म्हणूनच मग भावतंत्र भक्ती संप्रदाय स्वीकारून हिंदू धर्माची निर्मिती अत्यंत पद्धतशीरपणे करून विष्णू आणि शिव या दोघांना सन्मान देणे सुरू झाले भारतात भक्ती संप्रदायाच्या अंगाने जर का आपण हिंदू या शब्दाची व्याख्या करायची ठरवले तर शिव शक्ती विष्णू लक्ष्मी गणपती आणि स्कंद या सा देवतांची पूजा किंवा त्यांच्या अवतारांची किंवा रुपांची पूजा करणारे लोक अशी करता येते भारतात ब्रह्मदेवाची पूजा आजही केली जात नाही कारण ब्राह्मणांनी त्याची हकालपट्टी केली कारण ब्राह्मणांच्या क्रिएशन सिद्धांतामध्ये ब्रह्मदेव जे काही करतो आहे ते स्वीकारणे इस्लामिक कालखंडामध्ये अशक्य बनत गेले ब्रह्मदेव आपल्या मुलीच्या मागे लागल्याने आणि तिच्यापासून संतती झाल्याने त्याच्यावर बंदी घालणे हे ब्राह्मणांसाठी आवश्यक झाले
आज आपण जर का दैनंदिन व्यवहारात हिंदू काय करतो हे पाहिले तर तो या सहा लोकांची सहा देवतांची त्यांच्या विविध रूपांची आणि अवतारांची पूजा करतो असे आपणाला म्हणता येते हे करताना पद्धतशीरपणे शिव आणि शक्ती यांचे सामर्थ्य कसे कमी करता येईल हे पाहिले जाते अलीकडे तर महालक्ष्मीलाच शक्ती म्हणण्याची आणि तशी प्रथा रूढ करण्याची चाल निघालेली आहे ब्राह्मणांचा उद्देश साफ आहे सर्वात प्रथम शैव धर्मी लोकांना बहुजनांना गोंजारायचे आणि हळूहळू सर्व शैव धर्म नष्ट करून टाकायचा असा हा प्लॅन आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुजन समाजाला यातल्या काहीही गोष्टी कळत नाहीत तो हे सर्व होऊ देत आहे त्यासाठी मग अनेक कथा वापरल्या जातात उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद काश्मीरमध्ये गेले तर तिथे कालीच्या मंदिराची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले तर स्वप्नात किंवा दृष्टांतात येऊन त्यांना काली म्हणाली की माझी काळजी तू करू नकोस माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आता ही कथा वारंवार सांगितली जाते कारण शैव लोकांनी कालीच्या रक्षणासाठी काहीच करू नये काली स्वतः स्वतःचे रक्षण करायला समर्थ आहे असे म्हटले की कालिचे स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी शैव लोकांच्यावर येत नाही ही मुद्दाम ठेवलेली पळवाट असते जेणेकरून शैवाने काही कृतीच करू नये हे अत्यंत पद्धतशीरपणे केले जाते त्यातच स्वामी विवेकानंद यांचे नाव असल्याने आणि हे कथन बहुदा सत्य असल्याने त्याचा प्रभाव ताबडतोब पडतो जर काली इतकी समर्थ होती, तर मग काश्मीरमध्ये सगळे मुसलमान झालेच नसते की कालीमातेनेच सर्व शैव लोकांना मुसलमान होऊ दिले ? शैव लोकांनी आता स्वतःची जरा बुद्धी वापरणे फार आवश्यक आहे आणि स्वतःच्या धर्माचे आणि स्वतःच्या नीतिमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे श्रद्धा किती ताणायची याचा पोच बाळगावा लागतो सर्व काही देव बघून घेईल या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही कारण जीव हाच शिव असतो आणि शिव हे आपणच या जगामध्ये जगताना अमलात आणायचे असते मुळात सर्व देवता या माणसाने त्या अमूर्त शून्यापाशी जाण्याकरता निर्माण केलेल्या असतात मोक्षासाठी निर्माण केलेल्या असतात किंवा निसर्गापुढे झुकून निर्माण केलेल्या असतात त्या संकल्पना असतात त्यामुळेच त्या संकल्पना काय आहेत त्या कशा विकसित होत गेल्या यांचा अत्यंत जमिनीवर राहून अभ्यास करावा लागतो शिव,शक्ती, संसार किंवा पसारा , ईश्वर आणि मोक्ष हे आदिपंचायतन सत्य आहे परंतु ते तुमचा इतिहास घडवतं या भ्रमात राहू नका ते इतकं अफाट आहे की पृथ्वी ही त्यांच्या संदर्भात नगण्य आहे इतिहास माणसाला माणसाचा घडवावा लागतो सध्या शैव धर्म दोन बाजूंनी संकटात आहे पहिले संकट भारत देशापुरते ब्राह्मण धर्माचे आहे तर दुसरे संकट जगामध्ये आणि भारतामध्ये इस्लाम धर्माचे आहे आणि एकाच वेळी या दोन्ही संकटांचा मुकाबला करावा लागणे अटळ आहे अशा वेळी नेमके काय पाऊल टाकायचे हे ठरवायचे असेल तर बसवेश्वर ,शिवाजी महाराज, संभाजी महाराज , पहिला बाजीराव , यशवंतराव होळकर , महात्मा फुले यांच्या इतके उपयुक्त मार्गदर्शन कोणीही करू शकत नाही
हे करतानाच आपणाला आपली इतिहास गणना निर्माण करावी लागेल कालगणना निर्माण करावी लागेल आणि ती किमान 22 हजार वर्षांपूर्वी पर्यंत न्यावी लागेल असे केले तरच आपणाला स्वतःचा स्वतंत्र शैव इतिहास लिहिता येईल अन्यथा इरोशियन कालगणनेमध्येच आपणाला घटन खाव्या लागतील गटांगळ्या खाव्या लागतील
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment