कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली त्याबद्दल अभिनंदन ! लिंगायतांना हिंदूत टाकून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न प्रथम ब्रिटिशांनी केला नंतर एतद्देशीयांनी ! मूळात ह्याची सुरवात श्रीपतीने केली होती . कुठलीही क्रांती वैदिकांच्या गळाला लावून तिची हवा काढून घेण्याचे तंत्र वैदिकांनी व्यवस्थित घोटवले आहे श्रीपतीने त्याची सुरवात केली आणि लिंगायत धर्मातही वर्ण आणि जातीव्यवस्था घुसली . स्वतंत्र धर्म म्हणून मागणी करतांना आम्ही वेद , वर्ण , जात मानत नाही असे मागणी करणाऱ्यांनी सांगितलय त्याचा प्रत्यय व्यवहारातही यावा नाहीतर अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे फायदे लाटण्यासाठी केली गेलेली एक राजकीय चाल एव्हढेच ह्या घटनेचे महत्व राहील तेव्हा नवा धर्म हे उत्तमच आहे पण लिंगायत प्रत्यक्ष व्यवहारात जातीयता पाळताना दिसले तर हिंदूंच्यात आणि त्यांच्यात फरकच राहणार नाही
तेव्हा उत्सव साजरा करतांना जबाबदारीही ओळखलेली बरी . बसवेश्वरांचा लढा हा वर्ण जाती अंताचा लढा होता हे प्रत्येकाने नीट लक्ष्यात घेतले तर बरे !नाहीतर नाव बसवेश्वरांचे आणि करणी वैदिकांची असा दुट्टपीपणा होईल आणि सारे मुसळ पुन्हा केरात जाईल
श्रीधर तिळवे नाईक
तेव्हा उत्सव साजरा करतांना जबाबदारीही ओळखलेली बरी . बसवेश्वरांचा लढा हा वर्ण जाती अंताचा लढा होता हे प्रत्येकाने नीट लक्ष्यात घेतले तर बरे !नाहीतर नाव बसवेश्वरांचे आणि करणी वैदिकांची असा दुट्टपीपणा होईल आणि सारे मुसळ पुन्हा केरात जाईल
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment