Thursday, July 30, 2026

 कम्युनिस्ट शैवविरोधी का आहेत ? श्रीधर तिळवे नाईक 


भारतात सर्वात पुरोगामी म्हणून समाजवादी आणि कम्युनिस्ट लोक मिरवत असतात म्हणून आता ह्या लोकांच्या शैव समाजाविषयीच्या धारणा काय आहेत मुळात धारणा आहेत का हे तपासण्याची वेळ आली आहे 


मार्क्सच्या भारताविषयीच्या लेखनात शैव हा शब्द एकदाही आलेला नाही आपण हे समजू शकतो कारण मार्क्स युरोपियन लेखनातून भारत समजून घेत होता 


कम्म्युनिझमविषयी पहिला संबंध हा लेनिनमुळे आला आणि लेनिनच्या कार्याविषयी व क्रांतीविषयी आदर दाखवणारे दोन्ही नेते हे चक्क हिंदुत्ववादी होते लोकमान्य टिळक आणि बिपीनचंद्र पाल ह्यामागचे कारण उघड आहे जहालांना हिंसक क्रांतीचे वावडे न्हवते जे मवाळांना होते गदर पार्टीचे लाला हरदयाळ हेही जहालांशी जोडले गेले होते गमतीचा भाग म्हणजे खिलाफत चळवळीतील काही मुस्लिम सोविएत रशियाकडून ब्रिटिशविरोधी मदत मिळेल म्हणून रशियात गेले होते कारण लेनिनने भांडवलशाही साम्राज्यशाहीत रूपांतरित होते असे सिद्धांतन केले होते हे बघण्याजोगं आहे कि मुस्लिम राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी नाही तर खलिफ़त स्टेटच्या रक्षणासाठी रशियाला गेले आणि इकडे ब्रिटिश सरकारने कम्म्युनिझम हा मुस्लिमविरोधी असल्याचा फतवा काढून त्यांना कॉर्नर केले (त्यावेळीही फतवे असे राजकारणाचे भाग होते ) १९२० साली ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस स्थापन झाली मात्र ती कुठल्याच राजकीय पक्षाने स्थापन केली न्हवती गांधींचा राजकीय प्रभाव थांबवण्यासाठी १९२१ साली श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी एक गांधी व्हर्सेस लेनिन नावाची पुस्तिका काढली ह्या पुस्तिकेचा एक दुष्परिणाम असा झाला कि भारतीय प्रोलिट्रीयत वर्गाचे गांधी हेच प्रतिनिधी आहेत हे शिक्कमोर्तब झाले आणि त्यांचा मार्ग योग्य नसल्याने लेनिनकडे वळा असे सांगण्यात आले कोण कुठला रशियात बसलेला लेनिन त्याला इथल्या भारतीयांनी आदर्श का मानावा ? पण परकीय नेत्यांच्याकडे तोंड करून बसण्याची कम्युनिस्टांची सवय ह्या पुस्तकांपासून सुरु झाली आणि कम्म्युनिझमचे विरोधक म्हणून हिंदुइझम व हिंदू हेही स्थिर झाले साहजिकच हिंदू धर्म हा कसा प्रोलिटरीयत वर्गाच्या हितसंबंधाच्या विरोधी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कम्युनिस्टांच्यावर आहे असा गैरसमज पसरला आणि कम्युनिस्ट हिंदूंना हाणत सुटले हा देश धर्म स्थापन करणारा देश आहे ही गोष्टच विसरली गेली सर्वात वाईट म्हणजे गांधींच्यात ट्रॅप झाल्याने ह्या देशातील प्रोलिटरीयट वर्गाचा धर्म हिंदू आहे अशी गैरसमजूत कम्म्युनिस्टांनी करून घेतली हा आंधळेपणा होता प्रत्यक्षात प्रोलिटरीएट वर्गाचा धर्म शैव होता आणि कम्युनिस्टांना हे अजूनही कळलेलं नाही 


१९२० ला सीपीआयची स्थापना ताश्कंदमध्ये झाली कारण ब्रिटिशांनी कम्युनिस्टांना भारतात घातलेली बंदी ! स्वामी विवेकानंद आणि अरबिंदो घोष ह्यांनी तयार केलेल्या पार्श्वभूमीमुळे बंगाल्यांनी (मानवेंद्रनाथ रॉय त्यांची पत्नी एल्विन रॉय अबानी मुखर्जी व त्यांची पत्नी ह्यांनी ) हा पक्ष स्थापन केला हे सर्व बंगाली शाक्त ब्राम्हण होते तरीही ह्यांना शाक्त दर्शनावर लिहावेसे वाटले नाही किंवा आपला धर्म काय आहे हे तपासवासा वाटला नाही 


सुरवातीपासूनच कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापन कार्यात मुस्लिमांचा वाटा महत्वाचा होता कारण त्यांना सुरवातीला खलिफत साठी कम्युनिझम सोयीचा वाटत होता आणि रशिया त्यासाठी मदत करेल अशी आशा होती 


२५ डिसेम्बर १९२५ ला झालेल्या साम्यवादी अधिवेशनात स्वतःला सत्यभक्त म्हणवणाऱ्याने कम्म्युनिझमच्या रशियाकरणाविरुद्ध आवाज उठवून कम्युनिझमचे भारतीयकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले इतके कम्म्युनिस्ट ह्या काळात रशियन झाले होते अर्थात त्याला प्रतिसाद मिळाला नाही 


आता रशियात डुबक्या घेणाऱ्या कम्युनिस्टांना जिथे तत्कालीन आवाज करणाऱ्या हिंदू धर्माकडे नीट पाहायला फुरसद न्हवती तिथे ते आवाजच न उरलेल्या शैवांच्याकडे काय बघणार ?


कम्युनिस्टांचा नालायकपणा हाही नाही . नालायकपणा हा आहे कि भारतीय तत्वज्ञानाची चिकित्सा करताना सगळे कम्युनिस्ट फक्त आर्य दर्शनांचाच विचार करतात तुम्हाला अनार्य दर्शने दिसत नाहीत ? हा काय भुक्कडपणा आहे ? हिंदूवादी आणि हिंदुत्ववादी आर्यांच्या दर्शनाचा विचार करतात हे मी समजू शकतो कारण हे मुळात एलिट लोकांचे पक्ष आहेत पण तुम्ही श्रमिकांचे कैवारी म्हणवता आदिवासींचे कैवारी म्हणवता आणि तुम्हाला त्यांनी मांडलेली शैव दर्शने साध्या चिकित्सेसाठी घेता येत नाहीत ?कि श्रमिकांना विचार करता येत न्हवता हा भुक्कड पाश्चात्य विचाराने तुम्ही इतके आंधळे झाला कि तुम्हाला इथल्याच श्रमिकांची दर्शने दिसायची बंद झाली ?


आर्य संस्कृती आणि शैव संस्कृती ह्यांच्यातील वाद हा शोषक ऐदी संस्कृती आणि शोषित शूद्र ठरवल्य्या गेलेल्या संस्कृतीतील वाद आहे शूद्र दर्जा हा कायमस्वरूपी स्वस्त कामगार मिळावा म्हणून केलेली योजना असते म्हणूनच शैव सतत वैष्णवीझमबद्दल बोंबा मारत असतात श्रीकृष्ण हा नामधारी क्षत्रिय असतो आणि तो प्रत्यक्षात सैनिकांना फळांची अपेक्षा न करता लढाईत मर असा उपदेश करत असतो हातात शस्त्र न घेणाऱ्या ब्राम्हणांचा तो प्रतिनिधी असतो तो बिनदिक्कत वैश्य शूद्र ह्यांना पाप योनी म्हणत असतो म्हणून त्याच्याविरुद्ध उभे ठाकावे लागते 


आपला कामगार वर्ग नेमका कुठला धर्म पाळतो का पाळतो ह्याची चिकित्सासुद्धा तुम्हाला करावीशी वाटत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या आर्य संस्कृतीत डुबक्या घेत आहात असा होतो कामगारवर्ग फक्त गणपती आणि शिवजयंती ह्यांच्याच जयंतीला आणि महाशिवरात्र व कुंभमेळ्याला एव्हढ्या मोठ्या प्रमाणात का जमतो ह्याची काही चिकित्सा कराल कि नाही ?


असो कम्युनिझमशिवाय शैवांचे घोडे पूर्वीही कधी अडले न्हवते आम्ही काही श्रमसंस्कृती मार्क्सकडुन शिकलेलो नाही आमच्यात ती शिव आणि बस्वेश्वरांकडून आलेली आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Sunday, July 26, 2026

 भगवान शंकरानीं तंत्र हा शब्द का वापरला श्रीधर तिळवे नाईक 


सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जगात प्रथम आदिमयुग आले ते कसे होते याचा पुरेसा अंदाज आलेला नाही त्यानंतर मात्र साधारण पंचवीस हजार ते पंधरा हजार बीसी या कालखंडामध्ये काही ठिकाणी श्रद्धा उदयाला यायला लागल्या त्यातून श्रद्धेची म्हणून एक संस्कृती उदयाला आली विशेषता भारतात हे मोठ्या प्रमाणात घडले साहजिकच त्यातून हळूहळू जमातींच्या संस्कृती निर्माण व्हायला लागल्या ज्या टोळ्यांच्या पुरत्याच मर्यादित होत्या प्रत्येक टोळीची स्वतःची म्हणून एक श्रद्धा पद्धत होती आणि ती त्यानुसारच जगत असे भगवान शंकरांचा कालखंड हा इसवी सन पूर्व 10000 च्या आसपास आहे त्याने त्यांनी स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना जे गवसले त्याला त्यांनी डोळा अक्ष असे म्हटले आणि हळूहळू तिसरा डोळा म्हणायला सुरुवात केली. पुढे या तिसऱ्या अक्षाला महाक्षय आणि पुढे मोक्ष म्हणण्यात येऊ लागले मोक्षाची ही मांडणी आधीच्या श्रद्धा संस्कृती पेक्षा पूर्ण वेगळी होती. श्रद्धेच्या केंद्रस्थानी मंत्र असत आणि ज्याला हे मंत्र अवगत असत आणि या मंत्रांशी निगडित विधी अवगत असत त्याला मांत्रिक म्हणत ही संस्कृती मंत्र संस्कृती होती. मंत्राचे दोन अर्थ होते एक यातून भारी दुसरा शहाणपण जडीत हळूहळू मांत्रिकांचे वर्चस्व इतके वाढत गेले की शहाणपण जडीत मंत्रांचा काळ जवळ जवळ नाहीसा झाला अशावेळी भगवान शंकर आले त्यांनी यामांत्रिक संस्कृतीला आव्हान दिले चॅलेंज दिले या संस्कृतीचा पायाच मंत्राने रचल्यामुळे त्या विरोधात काही वेगळा शब्द देणे आवश्यक होते म्हणून त्यांनी तंत्र हा शब्द दिला अलीकडे या शब्दाला टेक्नॉलॉजी हा अर्थ प्राप्त झाला असला तरी पूर्वीच्या काळात असा अर्थ नव्हता पूर्वीच्या काळात त्याला टेकनिक या अर्थानेच वापरले जात होते श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेला मंत्र या मोक्ष संस्कृतीने हटवला आणि त्या जागी तंत्र केंद्रस्थानी आणले म्हणूनच पुढील काळात तांत्रिक श्रुती असाही शब्द वारंवार वापरलेला दिसतो काही शैवांनी त्या ऐवजी तंत्रधर्म असा शब्द वापरलेला आहे खरंतर तंत्र म्हणजे मोक्ष मिळवण्याची टेक्निक अशी ११४ टेक्निक्स भगवान शंकर यांनी सांगितली ती सर्व 

१ शरीर उपाय किंवा योग उपाय

२ ज्ञान उपाय

३ क्रिया उपाय ह्याला वैष्णवांनी पुढे कर्मयोग म्हटले

४ शाक्त उपाय

५ भावोपाय याला पुढे भक्ती म्हटले गेले


अशी पाच उपायात विभागली गेली. ज्यांना पंच उपाय पंचोपाय म्हटले गेले आज सुद्धा तंत्र हा शब्द प्रामुख्याने टेक्निक या अर्थानेच वापरला जातो तर यातूनच पुढे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे जिला आज आपण टेक्नॉलॉजी असे म्हणतो शरीराला पुढे यंत्र असा शब्द रूढ झाला आणि प्रत्येक शरीराला उद्देशून तो वापरला गेला


वैदिक संस्कृती भारतात आली तेव्हा ती स्वतःचे मंत्र घेऊन आली मंत्र रचणाऱ्या लोकांना ऋषी म्हणण्यात आले पुढे नंतरच्या पिढ्यातील पुरोहितांनी हे मंत्र आपल्या ताब्यात घेऊन ते अपौरुषेय आहेत असे सांगून बळकावले ज्या ऋषींनी ते रचले त्यांना हटवण्याचाच हा प्रोग्राम होता या पुरोहितांना या मांत्रिकांना पुढे ब्राह्मण असा शब्द रुढ झाला आजही ब्राह्मण मंत्रच म्हणतात मात्र ते स्वतःला मांत्रिक म्हणवून घेत नाहीत कारण मांत्रिक हा शब्द मूळचा अनार्य शब्द आहे तंत्राच्या मार्गाने जाऊन मोक्ष साधना करणाऱ्या लोकांना तांत्रिक असे म्हटले जाऊ लागले. पुढे पुढे हा शब्द बदनाम करण्यात आला आणि आता तर तो निगेटिव्ह अर्थानेच रूळ झालेला आहे किंबहुना ही एक कोण कॉन्स्पिरसी आहे 


भारतामध्ये ज्या काही गोष्टींचा शोध लागला त्यातील एक कॉटन होती त्यामुळेच भगवान शंकराने सांगितलेली सर्व तंत्रे ही सूत सुत्त म्हणून जतन केली गेली ज्याचे संस्कृत मध्ये सूत्र झाले पाली अर्ध मागधित सुत्त झाले पुढें सूक्त झाले 


ही सर्व तंत्रे मौखिक परंपरेद्वारे जतन केली गेली आहेत याबाबतीत वैदिक काय किंवा शैव काय दोघेही सारखेच आहेत शैवांच्यात प्रामुख्याने गुरु ज्यांचे नंतर गुरव झाले आचार्य आणि पंडित यांनी शतकानूशतके ही सूत्रे सांभाळलेली दिसतात पुढे गुरव लोकांनी ज्ञानोपासना सोडली आणि ते कर्मकांडात अडकून गेले पंडित आणि आचार्य हे हळूहळू इसवी सन १२०० नंतर वैदिक परंपरेत दाखल होऊ लागले त्यातूनच तंत्र श्रुतीचा क्षय होऊ लागला मात्र लोकसंस्कृतीत मात्र ती कायमच टिकून राहिली आणि आजही ती टिकून आहे मंत्राला आव्हान देणारी ही तंत्रसंस्कृती आता स्वतःच सूत्रांना मंत्र मानते जगाच्या इतिहासात हे नेहमीच घडलेले आहे अनेकांना तर पैसा कसा कमावता येईल एवढेच पहायचे आहे बहुजन समाजाशी काही बांधिलकी असायला हवी ही जाणीवच नष्ट झाली त्याच्या परिणामी शैवधर्म आहे शैव मंदिरे अस्तित्वात आहेत पण शेव श्रुती मात्र अस्तित्वात नाही असा काहीतरी विरोधाभास तयार झालेला आहे त्यातच शैव पंडितांनी वैदिकांच्या प्रमाणे अनेक भाकडकथा रचायला सुरुवात केली भाकड ग्रंथ रचायला सुरुवात केले आणि मूळ उपदेश बाजूला पडले आता वेळ आलेली आहे की आपण मूळ तंत्रे व्यवस्थितपणे मांडावीत गेली ४० वर्ष मी ते करतोच आहे 


श्रीधर तिळवे नाईक