भगवान शंकरानीं तंत्र हा शब्द का वापरला श्रीधर तिळवे नाईक
सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जगात प्रथम आदिमयुग आले ते कसे होते याचा पुरेसा अंदाज आलेला नाही त्यानंतर मात्र साधारण पंचवीस हजार ते पंधरा हजार बीसी या कालखंडामध्ये काही ठिकाणी श्रद्धा उदयाला यायला लागल्या त्यातून श्रद्धेची म्हणून एक संस्कृती उदयाला आली विशेषता भारतात हे मोठ्या प्रमाणात घडले साहजिकच त्यातून हळूहळू जमातींच्या संस्कृती निर्माण व्हायला लागल्या ज्या टोळ्यांच्या पुरत्याच मर्यादित होत्या प्रत्येक टोळीची स्वतःची म्हणून एक श्रद्धा पद्धत होती आणि ती त्यानुसारच जगत असे भगवान शंकरांचा कालखंड हा इसवी सन पूर्व 10000 च्या आसपास आहे त्याने त्यांनी स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना जे गवसले त्याला त्यांनी डोळा अक्ष असे म्हटले आणि हळूहळू तिसरा डोळा म्हणायला सुरुवात केली. पुढे या तिसऱ्या अक्षाला महाक्षय आणि पुढे मोक्ष म्हणण्यात येऊ लागले मोक्षाची ही मांडणी आधीच्या श्रद्धा संस्कृती पेक्षा पूर्ण वेगळी होती. श्रद्धेच्या केंद्रस्थानी मंत्र असत आणि ज्याला हे मंत्र अवगत असत आणि या मंत्रांशी निगडित विधी अवगत असत त्याला मांत्रिक म्हणत ही संस्कृती मंत्र संस्कृती होती. मंत्राचे दोन अर्थ होते एक यातून भारी दुसरा शहाणपण जडीत हळूहळू मांत्रिकांचे वर्चस्व इतके वाढत गेले की शहाणपण जडीत मंत्रांचा काळ जवळ जवळ नाहीसा झाला अशावेळी भगवान शंकर आले त्यांनी यामांत्रिक संस्कृतीला आव्हान दिले चॅलेंज दिले या संस्कृतीचा पायाच मंत्राने रचल्यामुळे त्या विरोधात काही वेगळा शब्द देणे आवश्यक होते म्हणून त्यांनी तंत्र हा शब्द दिला अलीकडे या शब्दाला टेक्नॉलॉजी हा अर्थ प्राप्त झाला असला तरी पूर्वीच्या काळात असा अर्थ नव्हता पूर्वीच्या काळात त्याला टेकनिक या अर्थानेच वापरले जात होते श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेला मंत्र या मोक्ष संस्कृतीने हटवला आणि त्या जागी तंत्र केंद्रस्थानी आणले म्हणूनच पुढील काळात तांत्रिक श्रुती असाही शब्द वारंवार वापरलेला दिसतो काही शैवांनी त्या ऐवजी तंत्रधर्म असा शब्द वापरलेला आहे खरंतर तंत्र म्हणजे मोक्ष मिळवण्याची टेक्निक अशी ११४ टेक्निक्स भगवान शंकर यांनी सांगितली ती सर्व
१ शरीर उपाय किंवा योग उपाय
२ ज्ञान उपाय
३ क्रिया उपाय ह्याला वैष्णवांनी पुढे कर्मयोग म्हटले
४ शाक्त उपाय
५ भावोपाय याला पुढे भक्ती म्हटले गेले
अशी पाच उपायात विभागली गेली. ज्यांना पंच उपाय पंचोपाय म्हटले गेले आज सुद्धा तंत्र हा शब्द प्रामुख्याने टेक्निक या अर्थानेच वापरला जातो तर यातूनच पुढे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे जिला आज आपण टेक्नॉलॉजी असे म्हणतो शरीराला पुढे यंत्र असा शब्द रूढ झाला आणि प्रत्येक शरीराला उद्देशून तो वापरला गेला
वैदिक संस्कृती भारतात आली तेव्हा ती स्वतःचे मंत्र घेऊन आली मंत्र रचणाऱ्या लोकांना ऋषी म्हणण्यात आले पुढे नंतरच्या पिढ्यातील पुरोहितांनी हे मंत्र आपल्या ताब्यात घेऊन ते अपौरुषेय आहेत असे सांगून बळकावले ज्या ऋषींनी ते रचले त्यांना हटवण्याचाच हा प्रोग्राम होता या पुरोहितांना या मांत्रिकांना पुढे ब्राह्मण असा शब्द रुढ झाला आजही ब्राह्मण मंत्रच म्हणतात मात्र ते स्वतःला मांत्रिक म्हणवून घेत नाहीत कारण मांत्रिक हा शब्द मूळचा अनार्य शब्द आहे तंत्राच्या मार्गाने जाऊन मोक्ष साधना करणाऱ्या लोकांना तांत्रिक असे म्हटले जाऊ लागले. पुढे पुढे हा शब्द बदनाम करण्यात आला आणि आता तर तो निगेटिव्ह अर्थानेच रूळ झालेला आहे किंबहुना ही एक कोण कॉन्स्पिरसी आहे
भारतामध्ये ज्या काही गोष्टींचा शोध लागला त्यातील एक कॉटन होती त्यामुळेच भगवान शंकराने सांगितलेली सर्व तंत्रे ही सूत सुत्त म्हणून जतन केली गेली ज्याचे संस्कृत मध्ये सूत्र झाले पाली अर्ध मागधित सुत्त झाले पुढें सूक्त झाले
ही सर्व तंत्रे मौखिक परंपरेद्वारे जतन केली गेली आहेत याबाबतीत वैदिक काय किंवा शैव काय दोघेही सारखेच आहेत शैवांच्यात प्रामुख्याने गुरु ज्यांचे नंतर गुरव झाले आचार्य आणि पंडित यांनी शतकानूशतके ही सूत्रे सांभाळलेली दिसतात पुढे गुरव लोकांनी ज्ञानोपासना सोडली आणि ते कर्मकांडात अडकून गेले पंडित आणि आचार्य हे हळूहळू इसवी सन १२०० नंतर वैदिक परंपरेत दाखल होऊ लागले त्यातूनच तंत्र श्रुतीचा क्षय होऊ लागला मात्र लोकसंस्कृतीत मात्र ती कायमच टिकून राहिली आणि आजही ती टिकून आहे मंत्राला आव्हान देणारी ही तंत्रसंस्कृती आता स्वतःच सूत्रांना मंत्र मानते जगाच्या इतिहासात हे नेहमीच घडलेले आहे अनेकांना तर पैसा कसा कमावता येईल एवढेच पहायचे आहे बहुजन समाजाशी काही बांधिलकी असायला हवी ही जाणीवच नष्ट झाली त्याच्या परिणामी शैवधर्म आहे शैव मंदिरे अस्तित्वात आहेत पण शेव श्रुती मात्र अस्तित्वात नाही असा काहीतरी विरोधाभास तयार झालेला आहे त्यातच शैव पंडितांनी वैदिकांच्या प्रमाणे अनेक भाकडकथा रचायला सुरुवात केली भाकड ग्रंथ रचायला सुरुवात केले आणि मूळ उपदेश बाजूला पडले आता वेळ आलेली आहे की आपण मूळ तंत्रे व्यवस्थितपणे मांडावीत गेली ४० वर्ष मी ते करतोच आहे
श्रीधर तिळवे नाईक